मुंबई उर्जा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांसोबत पनवेल प्रांतअधिकारी कार्यालयात सकारात्मक बैठक

प्रभात पर्व न्यूज - Published: 20-Mar-2023 10:56 am

पनवेल : मुंबई आणि उपनगरांमध्ये भविष्यात विजेची चिंता मिटावी म्हणून केंद्र सरकारच्या उर्जा मंत्रालयाने मुंबई उर्जां प्रकल्पाच्या माध्यमातून १०० किलोमिटर ट्रान्समिशन लाईन टाकण्यात येणार आहे. पनवेल तालुक्यातील १६ गावांमधून जाणाऱ्या लाईनबाबत शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी प्रांतअधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठक पार पडली. माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी या बैठकीत आपले म्हणणे प्रशासनापुढे मांडले. 

             मुंबईनंतर मुंबईला लागून असलेल्या उपनगरांचा झपाट्याने विकास होत आहे. पनवेल तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळासह आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभे रहात आहेत. सिडकोकडून नव्या वसाहती विकसित केल्या जात आहेत. विरार अलिबाग कॉरिडोर, जेएनपीटी दिल्ली कॉरिडोर, बुलेट ट्रेन, तळोजा एमआयडीसीचा विस्तार आदी प्रकल्पांचा देखील यात समावेश आहे. या प्रकल्पासाठी आणि वाढत्या नागरीकरणासाठी भविष्यात मुबलक वीजपुरवठा व्हावा म्हणून केंद्र सरकारने उर्जां मंत्रालयाच्या माध्यमातून मुंबई उर्जां मार्ग ही ट्रान्समिशन लाईन उभारून 2 हजार मेगावँटपेक्षा अधिक वीज मुंबई आणि परिसरात आणता येईल अशी यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. कल्याणहून पनवेल मार्गे मुंबई असा मुंबई उर्जां प्रकल्पाचा मार्ग आहे. पनवेल तालुक्यातून जाणाऱ्या या मार्गांसाठी केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे जमिनीचे भूसंपादन केले जाणार नाही. केवळ टॉवर उभारण्यासाठी जमिन शेतकऱ्याकडून घेतली जाणार असून शेतकऱ्याला टॉवर खालील जागेला भरपाईची रक्कम दिली जाणार आहे. २०२२ रोजी नवे वाढीव दर शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. 

             पनवेल तालुक्यातील १६ गावांमधील जमिनीवरून ही लाईन जाणार आहे. ओवे, किरवली, आडिवली, धानसर, तुर्भे, नेवाळी, टेंभोडे, वलवली, कोलवाडी, पालीबुद्रक, हेदुटणे, चिंध्रण, चिंचवली, मोहदर, कांडप आदी १६ गावांमधून ही लाईन घेतली जाणार आहे. यामध्ये नैना, महापालिका आणि या हद्दीच्या बाहेरील गावांना वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहे. ही लाईन टाकण्यासंदर्भांत शेतकऱ्यांच्या तक्रारीवर तोडगा काढण्यासाठी प्रांतअधिकारी राहूल मुंडके यांच्या कार्यालयात शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबई उर्जा प्रकल्पाचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील हे देखील बैठकील हजर होते. तालुक्यात अनेक प्रकल्पांना इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, तरीही आमचा प्रकल्पाला विरोध नाही परंतू शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या अशी भूमिका पाटील यांनी मांडली. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांसोबत चर्चां करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक लावण्याचे या बैठकीत निश्चित झाले.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement